Monday, 3 December 2012
सिनेजगतात
' शुभकल्याण फिल्म्स ' यांची निर्मिती असलेल्या ' या टोपीखाली दडलंय काय ?' या सिनेमाचं शूट आता पूर्ण झालंय. कोल्हापूर आणि परिसरात हे शुटिंग झालं. गांधी टोपी घालून राजकारण करतानाच त्या टोपीआड असलेल्या कावेबाज डावपेचांना या सिनेमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. एका राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. अरविंद जगताप यांची कथा या सिनेमाला लाभली असून , यात अशोक सराफ , मकरंद अनासपुरे , सुवर्ण काळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमातल्या चार गाण्यांना दिवंगत संगीतकार बाल पळसुले यांनी संगीत दिलं असून वैशाली सामंत , नंदेश उमप , कविता निकम यांनी ही गाणी गायली आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दत्ताराम तावडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment